Thursday, April 7, 2011

स्वातंत्र्यपुर्व केशवराव जेधेचे कार्य...

स्वातंत्र्यपुर्व केशवराव जेधेचे  कार्य...
ब्रम्हाणेतरांमध्येच मराठे व तत्सम जाती यांचा जसा फार मोठा भरणा होतो, तासाच संख्येने मोठ्या असलेल्या अस्पृश्यवर्गाचाही होतो. यांच्यात जागृती घडवून आणून त्यांना वरिष्ठ वर्णाच्या पायरीवर आणून पोचविण्याच्या कार्याचाही पाया महात्मा जोतिबा फुले यांनीच घातला होतो. तेच कार्य शाहू महाराजांनीही आपल्या ...संस्थानात व संस्थानबाहेरील महाराष्टात अत्यंत पोटतिडीकेने केले. हेचे कार्य अधिक व्यापक प्रमाणात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी देशभर केले. आरंभापासून राष्टीय सभेबद्दल त्यांना प्रेम होते. राष्टीय सभा म्हणजे कॉग्रेस बलवान व्हावयाची असेल तर अस्पृश्यांच्या उन्नतीचा प्रश्न विशेषतः अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न हे कॉग्रेसच्या कार्याचे एक हाती आल्यावर त्यांना या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्यांचे एक अंग बनले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. पुढे काँगेसची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आल्यावर त्यांना या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य कर्मवीर शिंदे यांनीच केले. आणि त्याला यश येऊन कलकत्ता व नागपूर येथील अधिविशेनांत या कार्याचे एक राष्टीयकारण झाले. त्यामुळे अस्पृश्यवर्गांचा पाठिंबा कॉंग्रेसच्या कार्याला मिळाला. पुढे डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना राष्टीय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र चळवळी सुरु झाल्यावर त्यांच्यातील आंबेडकरवादी पक्ष त्यांच्याशी फटकून वागत असला त्तरी इतर बराच मोठा अस्पृश्यवर्ग कॉंग्रेसचा अनुयायी होता, हे विसरता येत नाही. पुढेही डॉ. आंबेडकर व गांधीजी यांचा सलोख झाल्यावर हाही भेद तात्पुरता मिटून कॉंग्रेसचे बळ वाढले. त्याच काळात ब्राह्मणेतर पक्षातही बरेच चढउतार झाले. केशवराव जेधे व जवळकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या हाती त्या पक्षाची सूत्रे आली. हे कार्यकर्ते कट्टर सत्यशोधक व ब्रह्मणेतरवादी होते. पत्रके, पुस्तके, जलसे, मेळे इत्यादी प्रचाराच्या साधनांनी त्यांनी टिळक पक्षाविरुद्ध विरोधाची प्रेचंड लाट निर्माण केली. पुणे म्युनिसिपालिटीत महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा उभारण्याच्या प्रश्नावर जे वादंग माजले व त्यात फुले, शाहू छत्रपती इत्यादी त्यांचा आदर्शांचा जो अपमान झाला, ब्राह्मणेतर चळवळीला जोर चढला जेधे-जवळकर सत्यशोधाक असले तरी बद्लत्या काळात राष्टाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या आकांक्षांशी समरण होऊन कार्य करण्याकडे त्यांच्या मनोवृत्तीचा कल होता. त्याच वेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वात फरक होत होता. महात्मा गांधीच्या हातात कॉंग्रेस आली आणि नेहरुंमुळे सामजवादी विचारसरणीचा तिच्यावर प्रभाव पडू लागला. महाराष्ट्यातील कॉंग्रेस नेत्यांमुळे न.वि. गाडगीळ हे अशा समाजवादी विचारसरणीचे होते. ब्राह्मणेतरांच्या आशाआकांक्षांशी समरण होण्याची दृष्टी त्यांच्यात होती. त्यांनी जेधे-जवळकरांना जवळ करून ब्राह्मणेतर पक्षाला कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.कर्मवीर शिंदे यांच्या सहाय्याने त्यांना यात यशही आले. काळाची ओळखून जेधे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मणेतर पक्ष कॉंग्रेसमध्ये वालीन झाला. त्यामुळे तिचे बळ वाढले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक चालवळी होऊन शेवटी १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले व भारतात लोकशाही स्थापन झाली.

No comments:

Post a Comment